
आठवणीतील पाऊले
पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांच्या भेटीचे आयोजन
मी ह्या कोर्सला जाणार हे पूर्वी निश्चितच झाले होते. ऑक्टोबर महिन्यात इयत्ता ११वीची (शालान्त परीक्षा वर्गाची) शैक्षणिक सहल दिल्लीला येणार हेही नक्की ठरले होते. दादा मला म्हणाले, की तू दिल्लीला काही दिवस आहेस, तर पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींचे दर्शन मुलांना घडवण्याच्या दृष्टीने त्यांना पत्र लिहून अगर भेटून, त्यांच्या भेटीचा दिवस ठरवता आला तर पाहा. एकूण २०० मुले आणि १५ शिक्षक सहलीला येणार आहेत.
मी दिल्लीला गेल्यावर पंतप्रधानांच्या सेक्रेटरींना भेटून शाळेची माहिती आणि पत्र दिले आणि त्यांना सांगितले, की महाराष्ट्रातील मुंबईच्या बालमोहन विद्यामंदिरातील इ. ११वीतील मुलांना पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे दर्शन घडवण्यासाठी भेट हवी आहे. त्यांना सहलीचा कालावधीही मी पत्रात नमूद केला होता. सेक्रेटरींनी माझे ते पत्र घेतले आणि तुम्हाला दोन दिवसांत त्यांच्या भेटीचा दिवस समजेल असे मला सांगितले. आश्चर्य म्हणजे दोन दिवसांनी त्यांचे पत्र आले, की सोमवारी सकाळी ११ वाजता बंगल्यावर शाळेतील विद्यार्थ्यांना भेटण्याचा दिवस निश्चित केला आहे. मला किती आनंद झाला हे शब्दांत सांगता येणार नाही. मी लगेच दादांना मुंबईला फोन लावला. दादांनाही सदर भेटीच्या निश्चितीमुळे खूप समाधान झाले.
नंतर ती सर्व मुले एकत्र केली. प्रथम दादांनी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींचे मुलांतर्फे आणि शाळेतर्फे स्वागत केले व बालमोहनची थोडक्यात माहिती सांगितली. त्यानंतर इंदिराजींनी सुमारे अर्धा तास मुलांना राष्ट्राची अस्मिता, राष्ट्रसेवा, विज्ञानाची होत असलेली प्रगती व त्यात मुलांनी सहभाग कसा घ्यावा यासंबंधी आपले विचार सांगितले आणि मुलांना आशीर्वाद देऊन शाळेला शुभेच्छा दिल्या. इंदिराजींची ही भेट त्या मुलांच्या कायमची स्मरणात राहण्यासारखी झाली.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.